Posts

Showing posts from July, 2019

किल्ले जीवधन...पावसात भिजलेला आणि धुक्यात हरवलेला...(Trek to Jivdhan Fort)

Image
या वर्षी पावसाला थोडा उशीरच झाला आणि त्यात मनसोक्त भिजायला आम्हाला पण! म्हणूनच की काय सकाळी ४.३० अंगावर घेतलेला पाऊस आम्ही संध्याकाळी घरी येईपर्यंत खेळवत ठेवलेला होता. जीवधन.... स्वराज्याच्या 'नमन' नाट्यातील, पहिला, लहानसा 'गण' शहाजी राज्यांनी इथेचं सादर केला होता. १७ जून १६३३, जेव्हा निजामशाही बुडाली तेव्हा त्यांचा शेवटचा वंशज 'मुर्तुझा' याच किल्ल्यावर कैदेत होता. तेव्हा, निजामशाहीचे सरदार शहाजीराजे भोसले यांनी मूर्तझाची सुटका करून त्याला संगमनेरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर  निजामशाह म्हणून घोषित केले. निजामशाही टिकविण्याच्या बहाण्याने शहाजीराजांचा हा स्वराज्यनिर्मितीचा प्रयत्न सुरू झाला होता. या कार्यात त्यांना विजापूरचे सरदार मुरार जगदेव हेही सामील झाले होते. कुकडी खोऱ्यातील शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या किल्ल्यांच्या मदतीने त्यांनी योजलेली ही चाल मोगलांच्या लक्षात आली आणि मग हे आव्हान मोडण्यासाठी स्वत: शाहजहान दक्षिणेत उतरला. महमद आदिलशाहकरवी मुरार जगदेवची हत्या करण्यात आली. शेवटी उत्तरेच्या या प्रचंड फौजांपुढे  शहाजीराजांचा निभाव लागला नाही आणि त्...